सुंदर देशा,पवित्र देशा याबरोबरच विविध परंपरांनी समृद्ध देशा आणि सुंदर कलांच्या देखण्या देशा असेही महाराष्ट्राचे वर्णन करायला हवे.जे जे उत्कट,उदात्त, उन्नत ते ते सर्वत्र देशी पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. सह्याद्रीच्या राकट रांगा, किल्ले, सागरकिनारे,मंदिरे,गर्द वनराई, खडकामध्ये खोदलेली लेणी, जुनी अप्रतिम मंदिरे आणि त्यामध्ये असलेल्या अत्यंत सुबक आणि देखण्या मूर्ती, अभयारण्ये ही तर आपली वारसास्थळे आहेतच,हि आपण जपली पाहिजेत.आज काही गावामध्ये अनेक विरगळ व सतीशिळा सापडतात याचे योग्य संवर्धन होणे गरजेचे आहे.
- पळसंबे येथील रामलिंगची एकपाषाणी मंदिरे
- सांगशी येथील स्मारकशीला,गगनबावडा
- मोरजाई पठारावरील सतीशिळा,गगनबावडा
- पोहाळे येथील बौद्धकालीन लेणी
- पांडवदरा लेणी
- पावनखिंड
- कसबा बीड विरगळ स्मारक
- प्रतापराव गुजर स्मारक,नेसरी
- सरसेनापती धनाजी जाधव स्मारक,पेठवडगाव
- सरसेनापती संताजी घोरपडे स्मारक,कुरूंदवाड
- रामचंद्र पंत अमात्य स्मारक,पन्हाळा.
- छत्रपती शिवाजी महाराज मंदिर,पन्हाळागड
- छत्रपती शाहू महाराज समाधी,नर्सरी बाग
- छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती ताराराणी मंदिर,नर्सरी बाग

