कोणे एके काळी कामाक्ष नावाच्या दैत्याने महालक्ष्मी सहज सर्व देवतांना शेळी मेंढ्या मध्ये रूपांतरित केले होते. त्यावेळी महालक्ष्मीची दासी व पूर्वजन्मीची कौंडिण्य नावाच्या ऋषीची शापित पत्नी असणाऱ्या बाल कुमारिका त्र्यंबोली ने कामाक्षा चा योगदंड हिरावून घेऊन वध केला होता त्यानंतर करवीर निवासिनी आपल्या मूळ रूपात येऊन कुष्माण्ड भेदना चा सोहळा करण्यासाठी मंदिरात आली तेव्हा तिच्या लक्षात आले की त्र्यंबोली ला आपण विसरलो तेव्हा त्र्यंबोली ची समजूत घालायला करवीर निवासिनी लवाजम्यासह त्र्यंबोलीच्या टेकडीवर गेली