



प्रल्हादाची निष्ठा खरी करायला भक्तवत्सल नारायण कोरड्या खांबातून प्रगटले.जी जागा लक्ष्मीला नाही ती जागा म्हणजे दोन्ही मांडीवर आडवं घेऊन करूणाघन नरहरीनं हिरण्यकश्यपूला असलेल्या वरदानाचा मान राखत त्याचा वध केला.भक्ताचा अवमान पाहून खवळलेल्या नरशार्दूलाला पाहून लक्ष्मी ती मागे फिरली पण बाळ प्रल्हादानं देवाला शांत केलं.ही गोष्ट आपण सगळेच जाणतो.पण हा प्रल्हाद मोठा झाला.जस वय वाढलं तसा मनात एक सल वाढला आपल्या पित्याच्या मृत्यूच कारण आपणच आहोत.नारदांच्या सल्ल्यानं या पापातून मुक्त होण्यासाठी प्रल्हाद महाराज करवीरात आले.पद्माळा तीर्थाच्या तीरावर तप करायला लागला.तप पूर्ण झालं भगवती जगदंबा महालक्ष्मी स्वतः प्रगट होऊन म्हणाली वत्सा प्रल्हादा वर माग ! प्रल्हाद म्हणाला माते माझ आराध्य रूप तू नाहीस भगवान नृसिंह आहेत.देवी म्हणाली बाळा हे क्षेत्र माझं मी सर्वस्याद्य शक्ती ! इथं सर्व देवता माझ्यातच समाविष्ट आहेत.तू निष्पाप आहेस जे झालं त्यात तुझा दोष नाही.तू एक निमित्तमात्र! तुझ्या सारख्या हरीभक्ताला कर्मलेप लागत नाही. तरीही लोकांना शिक्षण म्हणून गंडकी नदीचे बारा गाडे शालीग्राम या पद्मालय तीर्थात टाक ! आणि तुझ्या मनातली शंका काढायला मी तुझ इष्ट नृसिंह रूप दाखवते. त्याक्षणी जगदंबा स्वतः नरसिंह रूपात प्रगटली.या घटनेची स्मृती म्हणून तिथे नृसिंहाचा तांदळा आणि प्रल्हादेश्वर शिवलिंग आजही पहायला मिळते.



