श्री जोतीबा चैत्र यात्रा वाडी-रत्नागिरी

श्री वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा ज्योतिबा अर्थात नाथ केदारेश्वर हे बद्रिकेदारचेचे रूप आहे.ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी व १२ सूर्याचे तेज या सर्वाचा मिळून एक तेजःपुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ ! ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज, प्रकाश,वायू, तेज, आप (पाणी) आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तीदैवत म्हणजेच वाडी रत्नगिरीचा ज्योतिबा.

"सासनकाठी" म्हणजे काय ?

सासनकाठी म्हणजे नाथ केदाराचा विजय ध्वज. याचबरोबर शिखरी काठी, नंदीध्वज, तरंग  अशी  विविध नाव घेऊन ही प्रथा दख्खन पठार ,कोकण, माणदेश, मावळ ,मराठवाडा,विदर्भ भागात सर्वत्र आढळते.पाडळीची सासनकाठी “कुलध्वज” या प्रकारात मोडते.याच मूळ कालिका पुराणातल्या इंद्र ध्वज महोत्सवाशी संबंधित आहे.वर्षेभर झालेल्या गोष्टी व पुढील वर्षी चे नियोजन दख्खनचा राजा जोतिबा चरणाशी सांगणे या पूर्वंपार चाललेल्या परंपरेने आज ही हजारो सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर जातात.सासनकाठीस शासनकाठी असेही म्हणले जाते.सासनकाठी ही सुमारे ४० ते ४५ फूट उंचीचे जाड वेळुची (कळकाची) असते.हा कळक आणताना व निवडताना विशिष्ट प्रकारे पारख व पूजा विधी केला जातो.हे निशाण,गर्द जांभळ्या रंगाचा फरारा ( पताका ) असतो.प्रत्येक सासन काठीचे निशाण’ हे वेगवेगळे असते. उदा. हिम्मतबहाद्दर चव्हाण सरकार यांच्या क्र.३ व ४ या काठ्या पांढऱ्या रंगाच्या आहेत,चालुक्य वंशीय साळुंखे घराणे म्हणजे नावजीनाथ यांची सासनकाठी ही भगव्या रंगाची आहे.मनपाडळे व फाळकेवाडीच्या सासनकाठी काळ्या पांढऱ्या रंगाच्या आहेत.सासनकाठीस तीन चुनी तोरणे बांधलेले असते.निशानावर फूलांच्या हारांची सुंदर आरास अतिशय कौशल्याने केलेली असते.सासनकाठी खांद्यावर घेऊन चालणे व तोरण्या (दोर) सांभाळणे हे अतिशय कौशल्याचे काम असते.ही तोरणे संभाळण्याचा मान प्रमुख तीन तक्क्षिमा मधील घराण्यांचा असतो व ते लोक ही तीन तोरणे कोशल्याने हाताळतात.

चैत्र पौर्णिमा हस्त नक्षत्रावर हा जोतिबा यात्रेतील मुख्य दिवस.पहाटे पाच ते सहा वाजता जोतिबाचा शासकीय महाअभिषेक होतो.पन्हाळ्याचे तत्कालीन तहसीलदार यांच्या हस्ते नाथांचा महाभिषेक केला जातो.साधारण सकाळी नाथांची महावस्त्र व अलंकारिक पूजा केली जाते.दुपारी एक ते दीड च्या दरम्यान मुख्य यात्रेचा प्रारंभ होतो.तत्कालीन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी,जोतिबा मंदिरातील सर्व पुजारी व मानाच्या सासनकाठ्या चे प्रमुख यावेळी उपस्थित असतात.सर्व विधी झाल्यानंतर शासन काठ्यांची मिरवणूक सुरू होते.संध्याकाळी पाच वाजता नाथाची आरती होऊन नाथांची पालखी श्री यमाई देवी कडे प्रस्थान करते. नाथांच्या पालखी बरोबरच नाथांचा मानाचा घोडा,उंट,वाजंत्री,देव सेविकांच्या सर्व लवाजम्यासह सर्व पुजारी यासह सर्व भक्तजन यमाई मंदिराकडे जातात.साधारण सव्वा सहा वाजता पालखी चौथ-यावर थांबून विसावा घेतला जातो.सूर्यास्तानंतर हिलाल दिवटीच्या प्रकाशात नाथांची पालखी यमाई मंदिराकडे प्रस्थान करते.साधारण सात वाजेच्या सुमारास यमाई मंदिरासमोर सदरेवर नाथांची पालखी विराजमान होते.यानंतर जगदग्नी चे स्वरूप कट्यारीसोबत श्री यमाई ( रेणुका ) देवीचा विवाह सोहळा संपन्न होतो.देवीसमोर कट्यारी धरण्याचा मान परंपरागत ठाकरे कुटुंबांकडे येतो.विवाह सोहळा संपूर्ण झाल्यानंतर नाथांची पालखी परत मंदिराकडे प्रस्थान करते.प्रदक्षिणा करून नाथांची पालखी सदरेवर विराजमान होते.यानंतर डवरी हे नाथांची गायन सेवा करतात.श्री कालभैरवाच्या येथे सर्व सासनकाठी मानकर्यांना मानाचे विडे दिले जातात. यानंतर तोफेची सलामी होऊन यात्रेची सांगता होते.

वेबसाईट बद्दलचा अभिप्राय नक्कीच नोंदवा

देव जोतिबा कोट्यावधी भक्तांच्या भक्तीविश्वाचा अधिपती या देवाची चैत्र यात्रा म्हणजे या तमाम भक्तांच्या आनंदोल्हासाचा क्षण ! पाडव्याला उभी केलेली सासनकाठी कामदा एकादशीला डोंगरावर आणायची देवाला प्रदक्षिणा घालून  नेमल्या जागी उभी करायची.हस्त नक्षत्रावर नाथ केदार यमाई भेटीला निघतो. तेव्हा ही सासनकाठी मिरवत यमाईकडे जायच. नाथाचा  गुलाल होऊन तृप्त व्हायच हा यात्रेचा विधी पण या मागचा इतिहास बघीतला तर लक्षात येईल हा आनंद सोहळा आहे देवी यमाई अर्थात रेणुका आणि महर्षी जमदग्नी यांच्या पुनर्मिलनाचा.    कृत युगात पिता जमदग्नींच्या आज्ञेप्रमाणे परशूरामाने माता रेणुकेचे मस्तक उडवले पण वरदानात पुन्हा माता बंधूला  जीवदान आणि जमदग्नी ऋषींच्या क्रोधाचा त्याग मागितला.  महर्षींनी क्रोधाचा त्याग करून रेणुका आणि पुत्रांना सजीव केले.  जमदग्नींच्या क्रोधाचा हा रवांश धारण करून हा रवळनाथ केदार अवतार झाला.  देव केदार दक्षिणेला आले नानाविध देवतांच्या हातून नानाविध असूरांचा वध करवला. औंध गावात औंधासूराचा वध करताना मूळमाया रेणुकेला येमाई अशी हाक मारली तीच माता यमाई.  पुढे रक्तभोज रत्नासुराचा  वध करून देव निघाले तेव्हा महालक्ष्मीने त्यांना थांबवून  त्यांचा  सेनापती म्हणून पट्टाभिषेक केला. नेमके या वेळी  यमाई ला आमंत्रण राहीले तीचा रूसवा काढायला देव निघाले बारा मुलखाचे भक्त देवाची शासन ध्वजा म्हणजे सासनकाठी घेऊन  डोंगरावर जमले  एकादशीला निघालेले देव हस्त नक्षत्रावर औंधला यमाईच्या दारी पोचले.देवांना पाहताच यमाईने दार बंद केले. इतरांना वाटल देवी रूसली पण नाथांनी अर्थ ओळखला माता पित्याची पुन्हा भेट घडवण्याची वेळ आली हे जाणून त्यांनी स्वतःच्या तलवारीतून जमदग्नीना प्रगट  केले माता आणि ऋषींची भेट झाली. तीन वर्षांनी  माता यमाईच स्वतः  रत्नागिरीवर आली.  आजही दरवर्षी नाथ यमाईच्या भेटीला जातात.  देव समोर सदरेवर बसतात देवांची कट्यार आत यमाईच्या गाभा-यात जाते तिथ रितसर यमाईरेणुका आणि कट्यार रूपी जमदग्नींचा विवाह होतो. हा सोहळा करवून नाथ  आपल्या भक्तांसह कृतकृत्य होतो.

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top